Thane Crime: अभ्यासाच्या बहाण्याने बोलवलं, माजी सरपंचाकडून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; महाराष्ट्र हादरला

ठाण्यातील मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीतल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
मुरबाडच्या नारिवली गावचा माजी उपसरपंच दयानंद भोईर याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने बोलावून आधी तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात दयानंद भोईर याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न केला असता, तिच्या नातेवाईकांनी तिला मुरबाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती पीडितेच्या आईला दिली. त्यानंतर पीडितेची आई रुग्णालय जाऊन तिला आत्महत्या का करत होती. असा जाब विचारताच तिने ऑगस्ट महिन्यापासून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. खळबळजनक बाब म्हणजे पीडितेन आईला सांगितले कि तो व्यक्ती मला दहावीच्या अभ्यास विषयी मार्गदर्शनच्या बहाण्याने गावातील एका पडीक घरात बहाण्याने बोलवून माझ्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र त्याने धमकी दिल्याने मी त्यावेळी घडलेली घटना कोणाला सांगितली नाही त्यामुळं याचाच फायदा घेऊन नराधम माजी उपसरपंचाने पीडित विधार्थिनीवर वारंवार अत्याचार करीत होता. याच नरधामकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळं त्रास असहाय्य झाल्याने पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पीडितेच्या ३५ वर्षीय आईने मुरबाड पोलीस ठाणे गाठून पीडित मुलीसोबत घडलेल्या घटनेविषयी कथन करताच मुरबाड पोलिसांनी २ डिसेंबर रोजी नराधम माजी उपसरपंचावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) सह पोक्सोचे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करत नराधम माजी उपसरपंचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे..मात्र या घटनेनंतर मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी नागरिक करीत आहेत.