राजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना फूस लावल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीचे पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार आणि राजभवनाचा रडीचा डाव असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. महाविकास आघाडीच्या जुळणीबाबत पवार यांनी या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 2019 मधील घडामोडींवर पवारांनी थेट भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, शिवसेना संबंधांवर पवार यांनी हे भाष्य केले आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली यावर पवारांनी प्रथमच भाष्य केले आहे. आज या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीचं प्रकाशन होणार आहे. या आवृत्तीत सध्याच्या अनेक राजकीय घडामोडींवर पवारांनी भाष्य केले आहे. काय आहे या पुस्तकात याची कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
लोक माझे सांगातीमध्ये यावर राजकीय भाष्य
– अजित पवार यांनी का केला पहाटेचा शपथविधी?
– शरद पवार यांचा घेतला होता सल्ला?
– एकनाथ शिंदे यांनी का सोडली शिवसेना?
– शिवसेनेत का झाली बंडाळी?
– शेवटच्या क्षणापर्यंत भाजपची राष्ट्रवादीसोबत चर्चा?
या सर्व प्रश्नांची उत्तरं शरद पवार यांचे आत्मचरित्र लोक माझे सांगातीमध्ये समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.